Friday, 18 May 2018

बियांचे ओटीभरण

' एका हाताने नांगरताना 'ती' धान्य ओटीतून धरणीच्या पोटात पेरत जाते
आणि तेच  'धान्य ' शतपटीने वृद्धिंगत होत 'तिच्या'कडे परत येते. 
या देवघेवीचे प्रतीक म्ह्णून प्रत्येक स्त्रीची  ओटी भरण्याची पद्दत रूढ झाली असावी . जेणेकरून तितक्या मोठ्या प्रमाणात धान्य तिच्या ओटीत घालून तिचा सन्मान करावा आणि तिने ते 'सृजन समृद्धीसाठी'जमिनीकडे वाहते करावे.'

या उन्हाळ्याच्या सुट्टीत
थोडीशी या सन्मानाची जाणीव म्ह्णून ,
तप्त काहिलीसाठी हतबल चर्चा सोडून करावयाचा एक ठोस उपाय म्हणून
आपल्या चिमुरड्यांसाठी 'सृजन' संस्कारचा भाग म्हणून
'एक बी म्हणजे एक जीवन' या तत्वाशी सांगड घालत ..
आपल्या काळ्या आईची ओटी बियांनी भरुयात का ?

ऊन वाढतंय तसे watsapp आणि सर्वत्रच फळे,  भाज्या यांच्या बिया साठवून पावसात त्या रस्त्याच्या कडेला / दरीत टाकून देण्याविषयीच्या posts येत आहेत.
तोच  धागा पुढे  घेत आपण हे काम  'मिळून साऱ्याजणी ' करूयात का ?
म्हणजे आपण सर्वजणी उन्हाळाभर या वेगळ्या बिया वर्गीकरण करत साठवू. जूनच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा शाळा सुरु होईल आणि पावसाच्या पहिल्या सरी सुरु होतील तेव्हा या बिया एकत्र जमवू. मग ज्या प्रकारच्या बिया जमल्या असतील त्याप्रमाणे पोहोचवू. म्हणजे भोपळा, कलिंगड  इ. बिया कोणाच्या शेतात पोहोचवू . जांभूळ, पपई थोडे कुठल्याश्या डोंगेरावर /रिकाम्या जागी लावू. खरेतर हे सर्व करण्यासाठी आपण साऱ्या मैत्रिणींची मिळून 'वर्षा सहलच' काढूयात की! जमलेल्या बियांचे शेवटी कसे नियोजन करायचे यासाठी ज्यांना यातली माहिती आहे त्यांनी कृपया माहिती सांगावी. 
या सर्व कामाला सर्वांच्या एकत्र प्रयत्नांची जोग मिळाली तर पर्यावरणाच्या (खरेतर आपल्याच मदतीचा) एक सुंदर प्रकल्प आपण करू शकतो.
कारण रस्त्यावर/ दरीत  टाकलेल्या  बीया काही वेळा सुकून जातात , काही वेळा रुजतात आणि एकदा त्या आपण टाकून दिल्या कि परत जाऊन पाहणे किव्हा त्याची काळजी घेणे हे आपल्या कडून घडत नाही. त्यामुळे त्या बिया कोणातरी काळजी घेणाऱ्या , यथायोग्य जोपासना करणाऱ्याच्या हातात पोहोचवणे ही सुद्धा आपली जबाबदारी आहे असे मला वाटते.

तर मग काय म्हणताय 'मिळून साऱ्याजणी' करूयात ना आपल्या 'मायमातीचे ओटीभरण'?

No comments:

Post a Comment