एकुणातच यंदाची निवडणूक , त्याची प्रचार भाषणे , exit polls आणि आजचा
निर्णायक दिवस या सर्वाचाच मिळून गेले २-३ महिने एक जल्लोषाचा माहौल बनून
राहिलेला आहे. राजकारणाशी रोजचा संबंध नसलेला सामान्य माणूसही ही आपलीच
लढाई असल्यासारखा जिकंण्याचा उत्साह अनुभवतो आहे. हा विजय त्याला आपला
वाटतो आहे.
आपल्यासाठी कोणीतरी चांगला विचार करतो आहे , त्यासाठी
विविध योजना त्याने खूप साऱ्या अडथळ्यांच्या शर्यती पार करत अमलात आणल्या
आहेत. भलेही त्यातल्या काहींची आत्त्ता सुरुवात आहे , त्याची फळे चाखायची
आहेत पण कोणीतरी स्वार्थापुढे राष्ट्रहिताच्या विचार मोठा ठरवत आपला विचार
करतो आहे हेही त्याच्यासाठी खूप महत्वाचे आहे. स्वतःच्या सय्यमशील ,
अनुकरणीय वर्तनाने जणू त्याने 'राष्ट्रभक्ती' जनमानसात फुंकली आहे जेणेकरून
आपापले काम नेटाने, प्रामाणिकपणे करण्याची प्रेरणा आज जागली आहे.
निवडणूक निर्णय अंतिम टप्प्यात असतानाही माध्यमे , आणि रस्त्या रस्त्यावर
लोक हा उत्सव आधीच मनवत आहे. एवढे प्रेम आणि आपुलकी क्वचितच कोणा नेत्याला
मिळाली असेल.
ही जादू घडवून आणणाऱ्या माननीय पंतप्रधान मोदी यांना मनःपूर्वक मानाचा मुजरा व हार्दिक
अभिनंदन!
🙏🙏🙏😇
सत्तेवर आल्यापासून पहिल्या दिवसापासून किम्बहुना त्याही आधी पासून
समर्थकांच्या अपेक्षा , विरोधकांचा विरोध , दुर्बीण घेऊन त्यांच्या
प्रत्येक कृतीची न्याहाळणी, तपासणी , आरोप , टीका यासर्वांना ते पुरून उरले
आहे आणि तितक्याच ताकदीने चोख अंमलबजावणी करत प्रसंगी जनरोषाचा धोका
पत्करत कितीतरी योजना राबवल्या आहेत. आणि म्हणून हा जल्लोष कोणीतरी 'आपला
माणूस' जिंकल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतो आहे. हा प्रत्येकाला
भावनात्मक विजय वाटतो आहे.
एरवी मी राजकारण या प्रकारापासून चार
हात लांब असते पण मोदीजींची भाषणे आणि मुलाखती आवर्जून बघते कारण त्यातून
मला रोजच्या जगण्याला प्रेरणा देणारे खूप काही सापडले आहे. त्यातले काही
आजच्या दिवसाचा जल्लोष म्हणून.
एका कुठल्याश्या लोकसंवादात एका कॉलेजातल्या तरुणाने मोदीजींना विचारले
"तुम्ही एवढे अथक काम करता. अजिबात सुट्टी घेत नाही. खूप सारा प्रवास
करता. जाईल तिथल्या लोकांसोबत संवाद साधता. तुम्ही नेमके काय खाता आणि थकत
कसे नाही?"
त्याचा हा निरागस प्रश्न ऐकून पूर्ण सभागृह हसले. मोदिजीही हसले आणि म्हणाले
"अरे मी एक नाही दोन नाही पाच पण नाही रोज लोकांच्या २० किलो शिव्या खातो."
असे म्हणताच सारे सभागृह हास्यकल्लोळात बुडून गेले.
खरच चांगले काम करणाऱ्या या माणसाला रोजच कितीतरी आरोप , टीका , निंदा सहन
करावी लागते. विरोधक विरोध करायचे थांबत नाही आणि हा माणूस त्य
गोष्टींना सकारात्मकपणे हाताळत आपले काम नेटाने करत करत राहतो.
कोणी त्यांना 'चौकीदार चोर है' म्हणत अवहेलना केली त्यांनी त्याचे 'मै भी
चौकीदार' आंदोलन करून टाकले आणि देशभरात सर्वच जण चौकीदार बनून काम करू
लागले.
कोणी त्यांना 'चायवाला' म्ह्णून हिणवले त्यांनी त्याची 'चाय पे चर्चा' सुरु करून टाकले.
कोणी त्यांचे स्वागत काळे झेंडे दाखवून केले त्याला त्यांनी 'नजर लागू नये म्हणून आईने लावलेला काळा टिका' करून टाकले.
कोणी म्हणाले 'Modi Go Back' त्यांनी 'मला पंतप्रधानपदासाठी परत जायला सांगताहेत' म्हणून टाकले.
एका मुलाखतीत त्यांना विचारले "आम्हा सामान्य माणसांना काम करून जेव्हा
कोणी टीका करते तेव्हा खूप वाईट वाटते. तुम्ही ही दररोजची टीका कशी
हाताळता"
त्याला त्यांनी दिलेले उत्तर रोजच्या आपल्या जीवनात आपण टीका कशी स्वीकारावी याचेच द्योतक आहे.
"एवढा मोठा देश आहे एवढे मोठे काम आहे तर टीका होणे खूप महत्वाचे आहे.
कारण त्यातून कमतरता पुढे येतात त्यावर तुम्ही काम करून प्रगती करू शकता.
खरे पहिले तर टीका खूपच कमी होते आहे. कारण आपल्या इथे टीका नाही आरोप
होतात आणि विरोधासाठी विरोध होतो याचे दुःख आहे. टिकेकडे मी लक्ष देत नाही"
खरंच टीका आणि आरोप यांचे योग्य विश्लेषण करता आले की प्रगती ही किती ऑटोमॅटिक आहे नाही.
टिकेकडे लक्ष्य देत नाही हे म्हणणे सोपे आहे पण ते प्रत्यक्षात आणणे,
गेल्या ५ वर्षात एकही पत्रकार परिषद न घेता आणि तोच वेळ खरे काम करण्यात
सत्कारणी लावणारा नेता म्हणून मोदीजी खरच अनुकरणीय आहेत.
'तुम्ही नेमके काय खाता आणि थकत कसे नाही?' या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी एक सुंदर रूपककथा सांगितली.
एकदा हिमालयात एका तळ्याकाठी एक संन्याशी तप करत बसलेले असतात. तिथल्याच
एका छोट्या टेकडीवर त्यांना एका ८ वर्षांची मुलगी आपल्या ३ वर्षांच्या
भावाला पाठीवरून घेऊन जाताना दिसली.
"बेटा तुला ओझे नाही होत आहे का ?"
ती हसत म्हणाली "हा तर माझा भाऊ आहे."
"बेटा मी तुला तो कोण आहे ते नाही विचारत नाहीये. तुला ओझे नाही होत आहे का "
ती परत हसत म्हणाली "स्वामीजी , हा तर माझा भाऊ आहे."
थोडेसे चिडून त्यांनी तिला परत विचारले "बेटा अग मी तुला केव्हापासून विचारतो आहे तुला त्याचे ओझे नाही होत आहे का ?"
ती खूपच हसायला आले "स्वामीजी , हा तर माझा भाऊ आहे. याचे ओझे मला कसे वाटेल?"
पूर्व देशाची विश्वासार्हता आपल्या पाठीवर वाहून नेऊन देशाला आशेचा नवा
सूर्य दाखवणाऱ्या , त्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी अहोरात्र अविरत कष्ट
करणाऱ्या मोदीजींना पुढील कार्यकाळासाठी म नःपूर्वक शुभेच्छा व
अभिष्टचिंतन!
🙏🙏🙏 सर्व देशवासीयांचे प्रेम आणि पाठबळ असेच तुम्हाला कायम मिळत राहो!!
🙏
- सौ. मेधा कौशल देशपांडे
#मेधालाडदेशपांडे #narendramodi
#namonamaha